वाशिम:-स्थानिक मानोरा तालुक्यातील अतिशय दुर्गम दुर्लक्षित आदिवासी बहुल गिराटा या गावातील भूमीहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे निवेदन सादर करून 2005 पासून कसत असलेल्या जमिनीचे पट्टे करून देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा महिला मानोरा तालुकाध्यक्ष सौ. सीमा प्रकाश राठोड व गिराटा या गावातील बहुसंख्या महिला व आदिवासी बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कसत असलेल्या जमिनीचे कायम पट्टे देण्याचे आदेश व्हावे अशी लेखी निवेदनाव्दारे विनंती करण्यात आली.
गिराटा या गावी बहुसंख्या आदिवासी बांधवांकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलाबाळांच्या शिक्षणाच्या खर्चा करिता कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे पडीक खडकाळ या जमिनीवर मशागत करून कसेबसे आपले पोट भरत आहेत करिता पुढील कार्यवाही करण्याची विनंती सर्व आदिवासी बांधव व भाजपा महिला मानोरा तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा महिला प्रदेशाध्यक्ष सौ.सीमा राठोड यांनी केली.यावेळी महिला व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने ऊपस्थीती होती.
वार्तांकन : फुलचंद भगत





